अनेक वर्षांनी प्रस्थापितांविरुद्ध तगडा उमेदवार मिळाल्याने जनतेतून होतेय स्वागत
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता पार्टीचा दबदबा राहिला आहे. मात्र आता प्रस्थापित उमेदवाराविरुद्ध तगडा उमेदवार उभा राहिला असल्याने भाजपच्या गडाला सुरुंग लागत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या १० दिवसांत सर्व १२ उमेदवार हे त्यांचे नशीब आजमावत मतदारसंघात मत मागण्यासाठी आवाहन करीत फिरत आहे. भाजपकडून पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवार गिरीश महाजन यांचा जोरदार प्रचार करीत आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये तर ‘आमच्यासमोर आजही तगडा उमेदवार नाही’ अशी भावना निर्माण झाली आहे. मात्र माघारीची तारीखनंतर गेल्या १० दिवसातील प्रचारात भाजपापिछाडीवर पडत असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, गेल्या ३ दशकांपासून भाजपचा हा बालेकिल्ला राहिला आहे. गिरीश महाजन हे सहावेळा आमदार झाले. त्या बळावर मंत्रिपद देखील महाजन यांना मिळाले. मात्र आता मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत असून जनतेचा यंदा सूर बदललेला आहे. जनता आता मतदानाच्या दिवशी तुतारी वाजविण्यासाठी सज्ज झालेली आहे. भाजपच्या गडाला सुरुंग लागत असून यंदा बदल होण्याच्या आशा जामनेरकरांना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, मंत्र्यांची माणसे स्वतःलाच आमदार समजू लागल्याने जनता कंटाळली आहे. त्यामुळे यंदा खोडपे सर निश्चितच निवडून येतील असेही त्यांचे म्हणणे आहे.