मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. यानुसार राज्याचा जीडीपी 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
– भूमिपुत्रांना ८० टक्के नोकरीसाठी कायदा करू
– शिकाऊ योजनेसाठी ६ हजार कोटी रुपये. पुढील वर्षीपासून योजना सुरु होणार.
– उच्च-तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रुपये.
– १०वी उत्तीर्णांना रोजगार प्रशिक्षण देणार.
– ५ वर्षात १० लाख बेरोजगार प्रशिक्षित
– कर्नाटकात मराठी दैनिकांना अनुदान देणार
– महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मराठी शाळा अत्यंत नेटाने चालवणाऱ्यांच्या मागे उभं राहणं कर्तव्य
– शालेय शिक्षणासाठी २ हजार २२० कोटी
– सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची वसाहत विकसित करण्याचं नियोजन
– ९९६ प्रकारचे उपचार मोफत देणार. गुडघा, खुबा रोपणात मोफत उपचारात समावेश
– साकोलीचे रुग्णालय १०० खटांचे करणार
– राज्यात ११ जिल्हा रुग्णालये २१ स्त्री रुग्णाले उभारणार
– नव्या रूग्णवाहिकांसाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करणार.
– मेडिकल डिग्रीच्या ११८ जागा वाढविणार.
– प्राथमिक आरोग्यासाठी ५ हजार कोटी
– वैद्यकीय शिक्षणासाठी २५०० कोटी
– सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १० हजार कोटी
– राज्यात विमानतळ उभारणार. विमानतळ विकासासाठी ७८ कोटी रुपये.
– एसटी बसस्थानकांसाठी ४५६ कोटी. एसटीच्या ताफ्यात १६०० नवीन बसेस. महामंडळाची वायफाययुक्त बस
– राज्यातील प्रमुख सागरी मार्गावर जेट्टी बांधण्याचे काम प्रगतीपथावर
– बंदरे विकासासाठी २७६ कोटी रुपये
– राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रिंगरोड उभारणार
– मनपा, नागरपरिषदांचे रस्ते रुंद करणार
– पुणे मेट्रोचा विस्तार करणार. यासाठी ५ वर्षापेक्षा अधिक निधी देणार
– निम शहरातले रस्ते रुंद करणार
– मुंबई-गोवा महामार्गाची केंद्राकडून १२०० कोटी रुपये
– केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्राला १२०० कोटी मंजूर
– शेतीसाठी दिवसाही वीज पुरविणार
– नागपूर जिल्ह्यात ऊर्जा प्रकल्प उभारणार
– पायाभूत सुविधांची किंमत २.४५ लाख कोटी
– मृदासंधारणाची २८०० कोटींची घोषणा
– गोड्यपाण्यातील मत्सोत्पदनाला प्रोत्साहन देणार
– ३ वर्षात सर्व ऊस शेती ठिबक सिंचनाखाली
– दरवर्षी १ लाख नवे सौरपंप बसविणार. १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित.
– जलसंपदा विभागासाठी १००३५ कोटी रुपये
– २ लाखांपेक्षा जास्त कर्जही माफी देणार
– कर्जपुर्नगठन योजनेत २ लाखांची घोषणा
– नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर देणार
– हे घोषणा करून मागे जाणारं सरकार आहे. मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.