किशोर सोनवणे खून प्रकरण, काही काळ तणाव
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये जुन्या वादातून किशोर अशोक सोनवणे यांचा बुधवारी रात्री खून झाला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजता, जोपर्यंत या खूनातील आरोपींना अटक केली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर एक तासभर ठिय्या आंदोलन केले.
पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, अन्य संशयित आरोपी मात्र फरार आहेत. या प्रकरणी आरोपींना अटक करावी, तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.
या मागणीसाठी कुंटूंबिय व नातेवाईकांनी थेट शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या विनंतीनंतरही नातेवाईक आंदोलनावर ठाम होते. शेवटी या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची हमी पोलिसांनी दिल्यानंतर, नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले.