जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षा प्रमाणे ‘मृगोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु या वर्षी खास आषाढी एकादशी निमत्त अभंगवाणीचा सुश्राव्य असा ” गजर विठू नामाचा” या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमात सुप्रसिध्द अभंग व नृत्य सादर करण्यात आली जसे की उठ पंढरीच्या राजा, ‘चंद्रभागेच्या तीरी, विठू माझा लेकुरवाला या सारख्या गीतांनी रसिक चिंब झाले. या गितांना मन प्रसन्न करणारे नृत्य व हार्मोनियम आणि तबला वादनाची सुरेल जोड मिळाल्याने कार्यक्रम उत्तरोत्तम बहरत गेला… गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दि. २४ जून रोजी सायं. ६.३० वा गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, श्रीमती गोदावरी पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. एन. एस. आर्वीकर, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील उपस्थित होते. गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, केंद्र व्यवस्थापक राजू पाटील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कथक शास्त्रीय नृत्याने साजन मोरे घर आये ही बंदिश व तराणा- रिया वर्मा, लावण्या पाटील, खुशिता कोल्हे, समृध्दी जोशी, प्रणिता शिंपी, राजस्वी चव्हाण, दिशा महाजन यांनी सादर केली. त्यानंतर उठ पंढरीच्या राजा हा अभंग वैष्णवी जोशी, साक्षी पाटील, खुशी पांडे, रिना वडोदकर, सिध्द्धी मेटकर, शितल जोशी यांनी सादर केला, तर ‘दर्शन दे रे भगवंता, सुंदर ते ध्यान, अजी सोनियाचा दिनू हे भक्तीगीत अनुक्रमे देवेश महाजन, नाजनीन शेख, निकिता जोशी यांनी सादर केले तर गायन विभागातील बाल कलाकार कबीर लांडगे, वेदिका झारे, कनकश्री अय्यंगार, आर्या सोनार, गीत साळवे, मित साळवे, मंजिरी जोशी, देवेश महाजन यांनी “चंद्रभागेच्या तीरी” हे गीत सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. त्यानंतर “विठू माझा लेकुरवाला” यावर कथक विभागाच्या विद्यार्थीनीं नेतल वर्मा, लावण्या दहाड़, पलक वर्मा, राधा पाटील, हितल चव्हाण, समृद्धी जोशी, खुशीता कोल्हे, राजस्वी चव्हाण यांनी सुरेल असे नृत्य सादर केले. “गायन विभागाच्या विद्यार्थ्यांनी “टाळ बोले चिपळीला हा अभंग रिया जिवानी, अल्का खैरनार, समृद्धी वैद्य, नंदिनी शिंदे, प्रियंका महाजन, गायत्री पाटील यांनी सादर केले. कानडा राजा पंढरीचा’ हे गीत ऋतुराज जोशी यांनी सादर केले. “खेळ मांडीयला” हे स्मिता पाटील, किरण सोनी, निकीता जोशी, चेतना पाटकरी, भाग्यश्री वानखेडे, नाजनीन शेख यांनी सादर केले.
“चल ग सखे पंढरीला ” हा अभंग खुशी पांडे हीने सादर केला. तर कथक नृत्यावर “मैं तो से बोलु ना” या गीतावर रिया वर्मा, कनकश्री अय्यंगार यांनी बहारदार नृत्य केले. ‘पांडूरंग मायबाप’ हे गीत प्रणव ईखे सादर केले. कार्यक्रमाची सांगता गायन विभागातील सर्व विद्यार्थी ‘विठू माऊली तु’ भैरवी राग सादर करुन झाली.
कार्यक्रमास साथसंगत म्हणून तबला- प्रविण महाजन, मृदुंग / पखवाज देवेंद्र गुरव तर हार्मोनियम भुषण खैरनार, झांझ- दिपाली महाजन, गिटार- प्रणव ईखे यांनी केली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेल असे निवेदन भाग्यश्री वानखेडे, वैष्णवी जोशी यांनी केले तर डॉ. महिमा मिश्रा यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू पाटील, किशोर चौधरी, अनंता साठे, राजेश साठे, नितिन पाटील, ईश्वर पाटील, भुषण पाटील यांनी परिश्रम घेतले.