जळगाव ;- जिल्ह्यात रविवारी सकाळी व त्यानंतर दुपारी अडीच ते तीन यावेळी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काही काळासाठी गारवा निर्माण झाला होता. मात्र यानंतर उकाड्यात वाढ झाली.
जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. शनिवारी दिवसभर कोरडी हवा होती. रविवारी देखील सकाळी कोरडी हवा ढगाळ ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच ते तीन यावेळी पाऊस झाला. नंतर ढगाळ वातावरण कायम होते. पावसाच्या अधुनमधून सरी सुरू होती. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदुर झाला .
दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांची मशागत पुर्ण होऊन ते खरीप पेरणीसाठी खते, बियाणे घेण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.