रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील घटना
रावेर ;- तोल काट्यावर दोन जणांमध्ये वजन करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाने मानेवर विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील केऱ्हाळे येथे घडली असून याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केऱ्हाळे येथील प्रिंपी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरलेल्या वाहनाचे वजन करण्याचे काम चालू होते. वजन काट्यावर ‘आधी वजन कोण करणार?’ या कारणावरून विकी यशवंत वाघ आणि रियाज रफिक तडवी यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने विकीने संतापात रियाजच्या मानेवर विळ्याने प्राणघातक वार केला.
न गणेश देविदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव, मंगल पाटील यांनी सबदर तडवी व रियाज तडवीला चापटा बुक्यांनी मारहाण केली. या बाबत सबदर हैदर तडवी रा. भोकरी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक तुषार पाटील करीत आहेत.