जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रामदास कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास माथेफिरुंनी दोन कार जाळल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील रामदास कॉलनीत यश जतीन गांधी हे राहायला असून ते व्यवसाय करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीयू ७३४८) क्रमांकाची कार आहे. सोमवारी १७ ऑक्टोबर रेाजी रात्रीच्या सुमारास त्यांनी कार घराच्या कंपाऊंटमध्ये लावली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास माथेफिरुंनी त्यांच्या कारला आग लावून पळून गेले. यश गांधी यांची आई पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठल्या असता, त्यांना कार जळतांना दिसून आली. त्यांनी मुलाला उठवून घटनेची माहिती दिली. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझविली. माथेफिरुंनी प्रभात कॉलनीत राहणारे महिपाल बोहरा यांची (एमएच १९ सीयू १९३९) क्रमांकाच्या कार देखील जाळून टाकल्याचे समजले. या दोघ घटनांमुळे नगरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी यश गांधी यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून अज्ञात माथेफिरुविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.