जळगांव:- शहरातील औदयोगिक वसाहत येथील झिपरू अण्णा विदयालयाचे चार शिक्षक,शिक्षिका यांनी न्याय मिळत नसल्याने संस्थाचालक,मुख्यापक ८ शिक्षक,विभागाच्या विरूध्द आजपासुन जिल्हा परीषद इमारत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत सविस्तर असे की,कोणतेही ठोस कारण नसतांना शिक्षक शुभम संजय पाटील,काजल युवराज राजपूत,पदमा महादु राठोड,राहूल भरतसिंग जाधव या चारही शिक्षकांना संस्थाचालक व मुख्याध्यापीका सौ.सुरेखा येवले यांनी सेवेपासून मुक्त ठेवले. या चारही शिक्षकांना विदयालयात आपल्या सेवेचे कर्तव्य बजावण्यासाठी मज्जाव केला व
अपमानित करून शाळेतून हाकलून लावले. त्याच बरोबर शिक्षक व महिला शिक्षकेचा बदनामी होईल असे आरोप केले.कुठलेही लेखी आदेश न देता गेल्या नऊ महिन्या पासुन सेवेपासून वंचीत ठेवले,याबाबत वेळोवेळी संस्थाचाल,मुख्याध्यापक जि.प.च्या शिक्षक विभागा सोबत
वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही कुठलाच न्याय मिळत नसल्याने व्यर्थात होवून अखेर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.| तरी या चारही शिक्षकांना तात्काळ सेवेत रूजू करणे,सेवेत रूजू झाल्यापासून संस्थाचालकांनी वेतन अदा केलेले नाही.ते त्वरीत मिळावे संस्था चालकांनी केलेल्या बदनामीच्या बाबत माफीनामा लेखी स्वरूपात दयावा ‘विदयार्थ्यावर दबाव ठाकून जो मर्जीप्रमाणे मजकुरलिहून घेतला . त्या विदयार्थ्याची व पालकांची माफी मागावी ,महिला शिक्षकेची खोटी बदनामी केली म्हणून संस्थाचालक यांची चौकशी करण्यात यावी,व कुठलेही ठोस कारण नसतांन
गेल्या नऊ महिन्यापासून खुलासा संस्था चालकांनी करावा या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे.