दोन महिन्यांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले
जळगाव (प्रतिनिधी) – मित्रांन सोबत पार्टीसाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा शिरसोली जवळ (चंबार दडी) पाझर तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋषिकेश उत्तम कचरे (वय २८, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. ५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शामाफायरच्या पाठीमागील चंभारदरी पाझर तलावात घडली.


ऋषिकेश कचरे हा त्याच्या काही मित्रांसोबत चंभारदरी पाझर तलावाजवळ पार्टीसाठी गेला होता. या दरम्यान, “मला पोहता येते” असे सांगून तो तलावाच्या पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले.

घटनास्थळावरून माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी चेतन पाटील, धनराज गुळवे,शिरसोली पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने धाव घेतली.
ऋषिकेशला पट्टीचे पोहणारे तीन जणांनी पाण्यात बाहेर काढले घटनास्थळा वरुन तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. ऋषिकेश कचरे याचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तो रोजंदारीवर हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे कचरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
112 ला काँल केल्या नंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पीएसआय नईम शेख , पोलीस काँ.रविंद्र प्रकाश.पाटील, पोलीस काँ. नितीन साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली








