नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – जागतिक इतिहासात ज्या दिवसाची दखल बलिदान दिन म्हणून घेतली जाते. तोचं आजचा दिवस, भारतीय स्वातंत्र लढ्याचे स्वरूप तीव्र करत भारतातील इंग्रज साम्राज्याची मुळ खिळखिळी करणाऱ्या तीन वीरांना ’23 मार्च’ याच दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली होती. चला तर मग जाणून घेवूयात भगतसिंग यांच्या जीवनातील काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला कोणीही सांगणार नाही.
फाशी दिली जाऊ नये अशी मागणी भगतसिंग यांनी केली होती. भगतसिंगानी फाशीच्या शिक्षेचा विरोध केला होता. भगतसिंगांच्या अखेरच्या पत्रात हा उल्लेख अढळतो, आम्ही क्रांतीकारी आहोत. मरण ही आम्हाला क्रांतीकरकां सारखचं देण्यात यावं, आम्हाला फासावर चढवण्यापेक्षा तोफेच्या तोंडी द्या अशी मागणी भगतसिंग यांनी केली होती. ब्रिटाशांनी मात्र ती मागणी धूडकावून लावली.ते उपोषण ज्याने सबंध जगाला भगतसिंगाचा आवाज ऐकायला भाग पाडलं-भारतीय कैद्यांना इंग्रज अमानवी वागणूक देत. जेवण, कपडे आणि राहण्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ठ दर्जाची होती. याविरोधात आवाज उठवतं भगतसिंगांनी अमरण उपोषणाचं अस्त्र उपसलं. 116 दिवसं चाललेल्या या उपोषणाने जागतिक माध्यमांचं लक्ष वेधल. इंग्लंड, अमेरिका अशा देशात या उपोषणाची चर्चा झाली. शेवटी भगतसिंगां पुढे इंग्रजांना झुकले. त्यांनी भगतसिंगांच्या साऱ्या मागण्या मान्य केल्या. जागतिक इतिसाहासील सर्वाधिक काळ चाललेल्या उपोषणांपैकी एक हे उपोषण असल्याचे इतिहासकारांचे म्हणने आहे.लेनिनच्या ऑक्टोबर क्रांतीनं दिली क्रांतीची प्रेरणा- रशियामध्ये लेनिनने 1917 ला सत्तांतर करत आणलेल्या साम्यवादी राजवटीनं क्रांतीने प्रेरित होवून भगतसिंगानी क्रांतीच्या अग्निकुंडात उडी घेतली. समाजवादी व साम्यवादी साहित्याचे त्यांनी प्रगढ वाचन केलं होतं. भगतसिंगांवर डाव्या विचारांचा पगडा होता.ठरलेल्या दिवसाच्या आदी देण्यात आली फाशी-भगतसिंग, राजगूरू व सुखदेव यांना 24 मार्चला फाशी देण्याचे लाहोर न्यायालयाचे आदेश होते पण ठरलेल्या वेळेच्या आधी 11 तास म्हणजे 23 मार्चला फाशी देण्यात आली.इंकलाब जिंदाबादची घोषणा सर्वप्रथम भगतसिंग यांनी दिली.इंकलाब जिंदाबाद म्हणजे क्रांतीचा विजय असो ही घोषणा भगसिंगानी रुढ केली. आजही विविध मागण्यासाठी मोर्च्यांमध्ये व आंदोलकांना प्रेरित करण्यासाठी ह्या घोषणेचा वापर केला जातो.