पाचोरा (प्रतिनिधी) अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पाचोरा तालुक्यातील बहुतेक गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर खडकदेवळा परीसरात करोड़ों च्या उत्पन्नावर पाणी पडले आहे शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे गहु, हरबरा, ज्वारी, बाजरी, मका आदी पिके शेतकऱ्यांच्या हातात आल्यावर अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे अवकाळी पाऊस आणि वारा वादळामुळे हजारो हेक्टर जमीन च्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे तर खडकदेवळा बुद्रुक, खडकदेवळा खुर्द, गाळण, अंतुर्ली, तारखेडा, यासह परीसरात अवकाळी पावसासह वादळवार्याने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घास निघुन गेला आहे खडकदेवळा परीसरात जवळपास दिडशे दोनशे एकर जमीनीचे नुकसान झाले आहे या परीसरात कॉग्रेस आय राहुल गांधी युथ ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तातडीने भेट घेऊन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे सह तहसीलदार श्री चावडे यांनी पंचनामे करून शासनाला लवकर कळवावे असे आवाहन करीत ही वस्तुस्थिती ची माहिती महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना कळविण्यात येईल असे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यावर सांगितले यावेळी
खडकदेवळा बुद्रुक येथील विश्वास पाटील, शांताराम देवरे, उत्तम पाटील, समाधान पाटील, विजय पाटील, राहुल पाटील, सुभाष पाटील, संदीप देवरे, विकास देवरे, बंटी देवरे, जगदीश ठाकरे, संजय पाटील आदी उपस्थित होते.