अमळनेर (प्रतिनिधी) – शहरात बुद्धिजीवी वर्गाद्वारे तथा लोकशाही बचाव संघर्ष समितीद्वारे आयोजित एनपीआर व एनसीआर व सीएए च्या विरोधात भरवण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ सुरेश खैरनार यांनीएनपीआर व एनसीआर व सीएए म्हणजे भारत देश हिंदुत्ववादी बनविणे हा संघाचा मुख्य अजेंडा आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
तर पुढे बोलतांना म्हणाले की, जनगणनेच्या नावाने एनपीआर व एनसीआर व सीएए करणे हा भारतीयांना वर्गवारीत वाटणे होय, तसेच खरी जनगणना ही 2021 साली सुरू होत असून एनपीआर व एनसीआर व सीएए हे कायद्याने बंधन कारक नाही तरी ते लादले जाऊ शकते, त्याबाबत जनतेने असंतोष पुकारला पाहिजे, बेरोजगारी तथा भुखबळी च्या विरोधात जेव्हढे लोक रस्त्यावर उतरले नाही त्या पेक्षा अधिक जनता या नागरिकायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रखर विरोध करीत आहे आणि सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असे प्रतिपादन केले तर प्रश्नोत्तराच्या वेळेत रक्तातील डीएनए आधारित नागरिकत्व द्यावे ,असा सूर उपस्थितां मध्ये दिसला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीम सालार यांनी महाराष्ट्र राज्य सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असा आशावाद व्यक्त केला आणि प्रा अशोक पवार यांनी एनपीआर व एनसीआर व सीएए विरुद्ध आंदोलन केले पाहिजे असे ठामपणे सांगितले.
याप्रसंगी दलित नेते रामभाऊ संदाणशीव, राष्ट्रीय किसान मोर्चा चे राज्य प्रभारी प्रा शिवाजी पाटील, प्रा लीलाधर पाटील, भारती गाला, गौतम सपकाळे, रणजित शिंदे, विश्वास पाटील, यशवंत बैसाने, दर्शना पवार,मुजफ्फर अली, प्रा जयश्री नगरसेवक शेखा हाजी, साळुंखे, नूर खान, मुन्ना शेख, आबिद शेख, सय्यद शौकत अली, उमाकांत ठाकूर प्रा सुनील वाघमारे, प्रा कदम, प्रा भालेराव, प्रा डॉ राहुल निकम, प्रा डॉ विजय तुंटे, सोमचंद संदाणशीव, वरिष्ठ पत्रकार सुनील करंदीकर, विजय गाढे आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.