जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा एन एस यू आय तर्फे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन येथे प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले..

“कर्म हेच ईश्वर”
संत सावता माळी यांचा जन्म अरणभेंड जि सोलापूर येथील पंढरपूर ईतक्या जवळ असल्यावर सुध्दा त्यांनी कधी मांदियाळी मध्ये जाण्याची ईच्छा दाखविली नाही आपले कर्म हेच ईश्वर म्हणून सतत शेतात राबून कष्ट करून ख-या विठुरायाचे दर्शन होते.. संत सावता माळी यांचा गाजलेला अभंग,
“कांदा, मुळा,भाजी..अवघी विठाई माझी..!”
आज समाजाला त्यांच्या विचारांची गरज आहे..
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमजद पठाण सत्यम कुमार पी जी पाटील ललीत कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.







