डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मेंदू व मणका विकार तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
जळगाव : डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञांनी मेंदूतील रक्ताच्या गाठेवर (हिमॅटोमा) यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला नवजीवन दिले. उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने रूग्णाच्या एक हाता-पायाची ताकद कमी होत होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील धर्मा कोळी यांना मागील काही दिवसांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. अचानक डाव्या बाजूच्या हातापायात कमजोरी जाणवू लागली. सुरुवातीला थोडा अस्वस्थपणा, डोक्याला प्रचंड वेदना आणि भोवळ आल्यासारखे वाटू लागले. कुटुंबियांनी तत्काळ त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक तपासणीत निदान
रुग्णालयात दाखल होताच मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी त्यांची सखोल तपासणी केली. प्राथमिक निरीक्षणातच मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील निदानासाठी तातडीने एमआरआय करण्यात आले. तपासणी अहवालानुसार मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे हिमॅटोमा (रक्ताची गाठ) तयार झाल्याचे स्पष्ट झाले. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गाठ वाढत होती, परिणामी मेंदूवर दडपण येत होते. यामुळे रुग्णाला पुढे जाऊन गंभीर न्यूरोलॉजिकल त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने क्रेनियोटोमी अँड मायक्रोस्कोपीक हिमॅटोमा इव्हॅक्युएशन या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
तीन तासांची यशस्वी शस्त्रक्रिया
रुग्णालयातील अनुभवी न्यूरोसर्जन डॉ. विपूल राठोड आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. क्रेनियोटोमी प्रक्रियेद्वारे मेंदूतील रक्ताच्या गाठीला निसर्गरूप देऊन ती बाहेर काढण्यात आली. मायक्रोस्कोपीक तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील संवेदनशील भागांना नुकसान न होऊ देता गाठ काढली गेली. संपूर्ण शस्त्रक्रिया तब्बल तीन तास चालली आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. आशिष बावनकर, डॉ. अर्शील शेख, डॉ. शुभम कालरा, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश, डॉ. शितल यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय रूग्णसेवक शालीक चौधरी यांनी सतत देखरेख ठेवली. काही तासांतच रुग्णाची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली. डाव्या हातापायातील कमजोरी हळूहळू कमी होऊ लागली आणि रुग्ण पूर्ववत होऊ लागला.
या शस्त्रक्रियेनंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपुल राठोड यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब हा मेंदूतील रक्तस्रावाचा एक मोठा कारणीभूत घटक आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार न मिळाल्यास रुग्ण अर्धांगवायू किंवा गंभीर गुंतागुंत असलेल्या स्थितीत जाऊ शकतो. या रुग्णाच्या बाबतीत वेळेवर निदान आणि शस्त्रक्रियेच्या निर्णयामुळे त्याचे जीवन वाचवता आले.
– डॉ. विपुल राठोड, मेंदू व मणका विकार तज्ज्ञ.
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील आधुनिक सुविधा