मुंबई(वृत्तसंस्था ) ;- काँग्रेसचे मुंबईचे माजी शहरअध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपा शंकर सिंग यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. ‘370 कलमाच्या जनजागृतीसाठी काम केले म्हणून त्यांना प्रवेश दिला’ असंही फडणवीस यांनी सांगितलं.
काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी यतीन कदम यांनीही प्रवेश केला.
‘आपल्यासाठी आनंदाची बाब की ताकद असलेले लोक प्रवेश करतात. मी त्यावेळी म्हणालो होतो की मोठी संधी आहे. जिथे लोक भाजपच्या विरोधात एकवटले तिथे भाजप वाढतो. त्यामुळे १-२ टर्म सत्ता नसेल तर आम्ही विचार करत बसत नाही. ज्यावेळी ३७० कलमाचा विषय आला त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागं झालं तेंव्हा त्यांना वाटले की भारताला एक संघ बनवण्यासाठी मोदी हे प्रयत्न करत असेल तर मदत केली पाहिजे. त्यांनी २१ महिने झाले काँग्रेस सोडून ते मधल्या काळात ३७० कलम बद्दल जनगागृती करत होते, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.