अमळनेर (प्रतिनिधी);- माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी कोरोना साथीस राष्ट्रीय आपत्ती सारखी मदत मिळणे या साठी जिल्हाधिकारी
डॉ अविनाश ढाकणे यांना पत्राद्वारे केली आहे.सध्या जगभरात कोविड-19 मुळे जागतिक आणीबाणीची स्थिती निर्माण झालीआहे.त्याचा सर्वात गंभीर परिणाम हातमजुरी करणारे मजूर वृध्द,महिला व बालक अश्या घटकावर होत आहे. स्वस्त धान्य दुकानात जरी धान्य असेल तरी ते विकत घेण्यास लागणारे पैसे या गरीब लोकांजवळ असतीलच असे नाही.अंगणवाडीतील पोषण आहार बंद झाल्यामुळे माता आणि बालकांचे किमान पोषण मुल्य खालावले आहे.शाळांमधील मध्यान्न भोजन बंद असल्यामुळे गरीबव वंचीत कुटुंबाच्या मुलांचा आधार सुध्दा संपला या सर्व पार्श्वभूमीवर कोविड-19 या साथीस राष्ट्रीयआपत्ती घोषीत केल्यानंतर मजूरांची,बालकांची, वृध्द,महिलांची उपासमारी थांबविण्याची आणिरोगामुळे नव्हे तर कुपोषणामुळे उपासमारीमुळे मृत्यू होवू नयेत.यासाठीसर्व उपासमार होत असणा-या बालकांना पोषण आहार द्यावा.सर्व गरजु गरीबांना रोजगार न मिळालेल्या महिलांना अन्न पुरवावे.वृध्द निराधार गरजू व्यक्तींना घरपोच पोषण द्यावे.
इत्यादी मागण्या माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.