अखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेली स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना आर्थिक मदत वन विभागाने द्यावी म्हणून चाळीसगाव येथील तहसीलदार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १९ नोव्हेंबर रोजी स्नेहल विजय पाटील रा. तांबोळे बु. ता. चाळीसगाव ही शेतात काम करत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ती पळत सुटली. पळत असताना विहिरीत जाऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला. स्नेहल पाटील हिच्यावर बिबट्याने हल्ला केला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी देखील बघितले आहे. परंतु वन विभागाने स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना आज पावतो कुठलीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन युवकांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना वन विभागाने आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. मात्र स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना आज पावेतो कुठलीही आर्थिक मदत जाहीर झालेली नाही.
वनविभाग जाणून-बुजून अन्याय करीत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्नेहल विजय पाटील हिच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर करावी. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दि. २६ रोजी तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष दादा पाटील, शहर कोषाध्यक्ष विजय पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, शहर संघटक किरण जाधव, मोतीराम मांडोळे, महेश पाटील आदी मराठा महासंघाच्या सह्या आहेत.