आईसह मुलाचा प्रचंड आक्रोश
जळगाव (प्रतिनिधी) : वरणगावातील गणेश नगर भागातील अध्यात्माची आवड असणाऱ्या सरोदे परिवाराला उत्तरप्रदेशातील तीर्थदर्शनाची आस होती. ती झाल्यावर तीर्थदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अपघातात या कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला. आता या परिवारात आजी आणि नातू एवढेच राहिले आहेत.
संदीप राजाराम सरोदे (वय ५०, रा. गणेश नगर, वरणगाव) हे त्यांची पत्नी, मुलगी, भाऊ, वहिणी व पुतण्या यांच्यासह तीर्थयात्रेला गेले. या अपघातात संदीप सरोदे यांची पत्नी पल्लवी सरोदे (वय ४५) मुलगी गोकर्णी संदीप सरोदे (वय २२) व पुतण्या अनुप हेमराज सरोदे यांचा मृत्यू झाला. तर भाऊ हेमराज सरोदे (५२) व वहिनी रुपाली सरोदे या गंभीर जखमी झाल्या आहेत. संदीप सरोदे यांच्या आई मंदा सरोदे व मुलगा शुभम सरोदे है तीर्थयात्रेला गेले नव्हते.
मयत गोकर्णी सरोदे ही जळगाव शहरातील आयएमआर महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होती. तर पुतण्या अनुप सरोदे हा काही महिन्यांपुर्वीच पुण्याला खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. संदीप यांचा विटभट्टीचा व्यवसाय होता. सर्व काही आनंदात सुरु असताना, अचानक त्यांच्या कुंटूंबावर काळाने झडप घातल्याने होत्याचे नव्हते झाले.