जळगाव ;- बाहेरगावाहून आलेल्या चौघांना होम क्वारंटाईन केले असतानाही त्याचे पालन न करता मास्क वगैरे न घालता फिरणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुमित बनसोडे आणि एक महिला (नाव गाव पुर्ण माहित नाही) हे गोधवली ता. भिवंडी जि.ठाणे येथून आले होते. या दोघांना साहील पठाण आणि आदील खान याना १५ मे रोजी जळगावात आणले. त्यानंतर जिल्हा कोवीड रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी यांनी तपासणी केली. त्यानंतर चौघांना होम क्वारंटाईन केले. असे असतांना सर्वजण नियमांचे उल्लंघन करत मास्क न लावणे, घराबाहेर विनाकारण फिरत असतांना आढळून आल्याने साहील पठाण (वय-२६) रा.पाळधी, ता.धरणगाव ह.मु.समतानगर, जळगाव, आदील नवाज खान (वय-२४), एक महिला (नाव गाव पुर्ण माहित नाही) आणि सुमित बनसोडे सर्व रा.शिवमंदीर, समतानगर, जळगाव यांच्यावर भादवि कलम १८८, २६९, २७० अन्वये रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, स.पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सपोनि मनोजकुमार राठोड, पोकॉ अतुल पवार, पोना नरेंद्र पाटील यांनी कारवाई केली.