जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील वैभव स्टेट बँक कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर मुरलीधर बागुल (वय ६३, रा. वैभव स्टेट बँक कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. १० मे ते १६ मे दरम्यान ते बाहेरगावी गेले असताना दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून दोन टीव्ही, ३५ हजार रुपये रोख, चांदीचे शिक्के, पैंजण, हेडफोन असा मिळून ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी किशोर बागुल यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाणे येथे मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेको संजय सपकाळे करीत आहे.