जळगाव (प्रतिनिधी) – सध्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात सुरु आहे. १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र जळगाव तालुक्यातील मोठ्या गावांमधून एकही उमेदवाराला तिकिटे कोणत्याही पक्षाने दिलेली नसल्याने नाराजीचे वारे सुरु झाले आहे. सदस्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा विचार सुरु केला आहे.
शिरसोली, म्हसावद, जळके, विटनेर,लोणवाडी,लमाजंन,कु-हाळदा,वाकडी,अशा गावांमधून कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवाऱ्या दिलेल्या नाही. तसेच अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांना गोड बोलून अर्ज भरू देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती दिली आहे. गावातून अपक्ष देखील उमेदवार ठेवला नाही त्याचे कारण गोड गोड आश्वासन दिले.
भाजपच्या ह भ प जळके महाराज यांना देखील ऐनवेळी माघार घेण्यास भाग पाडले. शिंदे गटामुळे उमेदवारी नाकारण्यात आली व माघार घ्यावी लागली असल्याची चर्चा होत आहे. यंदा शिंदे गटामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यक्ष भाग घेता आलेला नाही. त्यामुळे देखील पक्षांतर्गत नाराजी पसरलेली आहे.