जळगाव (प्रतिनिधी) – नवीन कृषी धोरणासार शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत. त्या योजना शेतकऱ्यांच्य घरापर्यंत नेण्याचा संकल्प आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य युवक विभाग अध्यक्ष सूरज विजय नारखेडे यांनी केला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून सूरज नारखेडे यांच्यासह चौदा उमेदवार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
सूरज नारखेडे हे या निवडणुकीत युवा तरुण, शेती आणि मातीशी नाळ असलेला तरुण चेहरा आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी युवा किसान संघटना जिल्हाध्यक्ष अशी वेगळी ओळख देखील आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असून त्यांच्या मदतीला धावून जावून त्यांना सहकार्य करण्याची त्यांच्यात इच्छा शक्ती आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो जगला पाहिजे आणि वाढला पाहिजे. तसेच त्यांच्या घामातून निघालेल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्याला न्याय मिळवून देण्याची इच्छाशक्ति सूरज नारखेडे यांच्यात आहे.
निवडणुकीत सूरज नारखेडे यांचे पारडे जड असून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी होईल, असा विश्व्यस त्यांनी व्यक्त केली आहे.
जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती विजय नारखेडे यांचे सुपुत्र सूरज नारखेडे अशी देखील त्यांची ओळख आहे.तसेच वडिल विजय नारखेडे यांच्याकडून सामाजिक, राजकीय आणि माणुसकी जपण्याचा वसा घेऊन जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच सूरज नारखेडे हे उमेदवारी करीत आहेत. वडिलांकडून मिळालेला वसा आणि वारसा यापुढेही जपण्याचा मानस सूरज नारखेडे यांनी व्यक्त केला आहे.