मुंबई (वृत्तसंस्था) – भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक निर्णय घेतले जात असून आज चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याने बावनकुळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तर आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान आशिष शेलार प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा होती. मात्र बावनकुळे यांची वर्णी लागल्याने चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
आगामी काळात अनेक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यानुसार भाजपच्या रणनीतीनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेमध्ये ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.