जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याच्या कारागृह प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या जळगाव जिल्हा कारागृहातील चिन्या जगताप हत्याकांडाच्या गुन्ह्यातील आरोपी दत्ता खोतची जामिनाची विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे .
जळगावच्या कारागृहातील तत्कालीन कारागृह रक्षक दत्ता खोत या गुन्ह्यातील पाच आरोपींपैकी एक आहे . खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर या आरोपींपैकी दत्ता खोत यानेच आधी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; त्यात मूळ फिर्यादी मिनाबाई जगताप यांनी अँड. जैनोदिन शेख यांच्यामार्फत तीव्र विरोध केला होता. आणि चिंन्याच्या शरीरावरील जखमा ह्या त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा शवविच्छेदन अहवाल विचारात घेऊन जिल्हा न्यायालयाने त्याचा हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यात; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याला अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर केल्यावर अन्य चार आरोपींनीही त्याचा संदर्भ देत जिल्हा न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला होता.
मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने खोत याचा मूळ अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यांनंतर दत्ता खोत याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती . उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळे त्या निर्णयाला आव्हान देण्याची विशेष परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती . या विशेष परवानगीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीनंतर सरन्यायाधीश एम. व्ही. रमण्णा , न्या कृष्ण मुरारी व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे . सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हा आरोपी कनिष्ठ न्यायालयात शरण गेल्यावर त्याने जामिनासाठी अर्ज केल्यास कनिष्ठ न्यायालय त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाने खोत याचा अटकपूर्व जमीन नांमजुर केल्यावर इतर आरोपीनी त्यांचा जळगाव सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज मागे घेतला होता, त्यातसुद्धा अँड. जैनोदिन शेख यांनी मूळ फिर्यादी मिनाबाई जगताप यांच्याबाजूने लेखी आक्षेप दाखल केला होता.
या गुन्ह्यात तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील हे ही अन्य आरोपी आहेत . यापैकी तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड हा काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या कारागृहात नेमणुकीला असूनही फरार झालेला आहे.