बचाव कार्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सावदा जवळ असणाऱ्या सुकी गारबर्डी धरणावर पर्यटनासाठी गेलेले दहा जण धबधब्याजवळ अडकून पडले आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तसेच जळगाव व धुळे येथील बचाव कार्याची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. घटनेवर लक्ष ठेवून असून पर्यटकांना बाहेर कसे काढता येईल याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी “केसरीराज”शी बोलताना दिली.
सकाळी अमळनेर इंदोर ही बस मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका पुलाचा कठाळा तोडून खाली कोसळल्याने त्यातील अनेक जण मृत्युमुखी झाल्याची घटना ताजे असताना व जिल्हा प्रशासन या कामात व्यस्त असताना आणखी एक धक्कादायक घटना सोमवार दि 18 जुलै रोजी संध्याकाळी घडली आहे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे नद्या नाले धरण तुडुंब वाहत आहेत यामुळे अनेक ठिकाणी धोक्याची पातळी देखील ओलांडली गेली आहे यामुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे धार जिल्ह्याची घटना ताजी असताना संध्याकाळी सात वाजता सुखी धरणावर ही घटना घडली आहे
सावदा गावाजवळ असणाऱ्या सुकी गारबडी धरणामध्ये संध्याकाळी धबधब्याजवळ पर्यटनाचा व निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दहा जण गेले होते अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे चारही बाजूने पाण्याचा प्रवाह वाढायला लागला त्यामुळे हे सर्व आठ ते दहा पर्यटक पुराच्या पाण्याने वेडले गेले त्यामुळे त्यांनी बचाव करण्यास कार्यासाठी आरडाओरडा सुरू केली जवळच असणाऱ्या गावातील काही नागरिकांना हे आवाज आल्यावर त्यांनी तातडीने प्रशासनाला कळविले त्यानुसार तालुक्याचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी गाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे स्थानिक पट्टीचे पोहणारे आणि इतर यंत्रणेची त्यांनी मदत घेतली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी धुळे येथून देखील बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता हे देखील घटनास्थळी असून बचाव कार्य सुरू आहे दरम्यान हे पर्यटक कोण व कुठून आले याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही दरम्यान बचाव कार्यामध्ये कुठलीही कमी राहणार नाही सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली तर पर्यटकांच्या नातेवाईकांनी काळजी करू नये त्यांना सुखरूप कसे बाहेर काढता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी कुठल्याही नदी धरण तलाव या ठिकाणी किनाऱ्यावर जाऊ नये तसेच पाण्यात उतरू नये सर्वत्र पावसाच्या पाण्याने धोक्याचे पातळी गाठली आहे जाणे धोक्याचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.