जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील म्हसावद शिवारात गिरणा पात्रातील कानाकोपऱ्यातील वाळू मजूर लावून बेसुमार उपसली जात आहे
दिवसेंदिवस वाळू उपसा होत असल्याने नदीचे पात्र खोलवर जाऊ लागले आहे. टप्प्या टप्प्याने दिवसभर रेतीचे ढीग करायचे अन् साठा एकत्र आणून चढत्या भावाने रेती विकायची.अशी शक्कल लढवून नदी पात्रात वाळू साफ केली जात आहे. दिवसेंदिवस महागाईने सामान्यांचे डोके फोडले आहे. गरीब माणसाचे घरकुल बांधकाम काढले तर त्याला ग्रामीण भागात रेती मिळणे मुश्किल होते श्रीमंताला पैसे देवुन घर बांधणाऱ्याला सोपे जाते
आता पावसाळा जवळ आल्याने वाळू माफियामध्ये ट्रॅक्टरने साठेबाजीची चढाओढ आहे. महसूल प्रशासन बघण्याची भूमिका घेते. दिवसाढवळ्या होणाऱ्या वाळू उपसाला रोखू न शकणाऱ्या प्रशासनाला अपयश येण्याच्या मागचं कारण गुलदस्त्यात असेल. जिल्ह्याभरात धडाडीच्या कारवाया होताना दिसतात. येथे स्थानिक प्रशासन वाळू ट्रॅक्टरवर कारवाईसाठी अपयशी ठरत आहे. याबाबत प्रशासनाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
जळगाव तहसीलदारांनी तातडीचे पथक तयार करून कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनीकडुन केली जात आहे.