जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यात वाढत असलेला कोरोना, चौथ्या लाटे संदर्भात रोज येणारे वृत्त लक्षात घेता जळगाव शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी काय खबरदारी घेता येईल यासाठी मनपाने उपाययोजना आखावी असे पत्र शहराचे आ.सुरेश भोळें यांनीं आयुक्तांना दिले.
राज्यात कोरोना पुन्हा वाढत आहे. अनेक जिल्ह्यात पुनःश्च निर्बंध लावण्यात येणार आहे जळगाव शहराची परिस्थितीदेखील बिकट होऊ नये खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे प्रत्येक प्रभागात मनपा मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे १००% लसीकरण करून घ्यावे. भविष्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी मनपातर्फे उपाययोजनांचा आराखडा तयार करून ठेवावा. जळगाव शहरात बाजार पेठ, शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे पूर्णत: खुले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या वाढू शकते.असे पत्र आ. सुरेश भोळे यांनी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना दिले.