पारोळा ( प्रतिनिधी ) – शिक्षक पिढी घडवितो.समाजाचा शिक्षकाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आहे.विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवित सुसंस्कृत युवक देशासाठी घडवितो.खऱ्या अर्थाने शिक्षक समाज परिवर्तनाचा घटक असल्याचे मत माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी व्यक्त केले. शिवाजी हायस्कूलचे उपशिक्षक वाय.टी.पाटील २७ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले.यांच्या सेवापूर्ती निमित्ताने निरोप समारंभप्रसंगी शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय.व्ही. पाटील होते व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश पाटील, सचिव माजी सभापती रेखा पाटील , संचालक मुरलीधर नावरकर , डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ मंदाकिनी पाटील , सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, माजी सरपंच प्रदीप पाटील, रंगनाथ पाटील, एकनाथ पाटील, अँड विजय पाटील, अविनाश पाटील, धुळपिंप्रीचे माजी सरपंच सुरेश पाटील, विकासो चेअरमन प्रमोद पवार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.व्ही.एस.पाटील डॉ मंदाकिनी पाटील यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्याध्यापक जी.बी पाटील , प्राचार्य ए.के.चव्हाण , ,मुख्याध्यापक बी.झेड. पाटील , व्ही.एस.पवार , अरुण पवार , पर्यवेक्षक के.ए. निकम आदी उपस्थित होते.
प्रस्तावना पी.आर.पाटील यांनी केली सूत्रसंचालन रावसाहेब भोसले तर आभार कौतुभ सोनवणे यांनी मानले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.