जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यात नव्याने नावारुपास आलेले अभिनव संकल्प प्रतिष्ठाण नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असते त्याप्रमाणेच, आता उन्हाचा पारा अधिकच तीव्र होत असतानाच जिथे माणसाला घोटभर पाण्यासाठी भटकावे लागते तेथे मुक्या पशुपक्ष्यांची अवस्था काय असणार हा विचार मनात घेऊन, पशुपक्ष्यांचे नष्ट होत चाललेले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अभिनव संकल्प प्रतिष्ठाण कडून पक्षी वाचवा संकल्पना राबवून जामनेर शहरातील विविध भागातील झाडांवर पक्षांच्या दाणा-पाण्यासाठी भांडी ठेवून जगण्याची सोय करण्यात आली.त्याप्रमाणेच दररोज पाणी व अन्न ठेवण्याची जबाबदारी देखील प्रतिष्ठाणच्या माध्यमातून घेण्यात आली.
आपण देखील भुतदयेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या घराच्या छतावर, अंगणात तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी मुक्या जनावरांना अन्न पाण्याची सोय करुन पशुसंवर्धनासाठी सहकार्य करावे, अभिनव संकल्प प्रतिष्ठाण यापुढे देखील नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत राहील. जास्तीत जास्त युवा मंडळींनी अभिनव संकल्प प्रतिष्ठाणच्या अभिनव संकल्पनेत सहभागी होऊन समाजातील न्याय हक्कासाठी लढण्याचे अनं समाजकार्य करण्याचे आवाहन प्रतिष्ठाण कडून करण्यात आले.
उपक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष निशांत पाटील, महेंद्र ढमाण, चेतन पारधी, चंदन रोनखेडे, धिरज पाटील, रितेश वाघ, सागर तावडे, स्वानंद सुरळकर, अभिषेक वर्मा, सत्यजित पाटील, रोशन डिमके, मंदार जोशी, सुनिल कानळजे सर, जयेश शिंदे व इतर सदस्यांनी मेहनत घेतली.