जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्याने काल 33 वर्षीय जितेंद्र संजय माळी याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जितेंद्र माळी यांनी काल दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे खमण विक्री केली आणि दुपारी ते शेतात कमला गेले होते . त्यांना आधी मांडळ गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले होते . त्यांना उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे होते . तेथून त्यांना अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची माहिती अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ आशिष पाटील यांनी दिली आणि त्यांना मृत घोषित केले . तथापि शवविच्छेदन अहवाल आल्यावरच वास्तव समजेल असे पोलिसांनी सांगितले अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
मंगळवारी जळगाव जिल्ह्याचा पारा 43.5 अंशावर होता पुढे अजून दोन दिवस राहणार तापमानाच्या पार्यात वाढ राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.