तळेगाव , ता. जामनेर ( प्रतिनिधी ) – परिसरात यावर्षी सुमारे शंभर एकरवर टरबूज लागवड शेतकऱ्यांनी केली असून यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारत चाललंय.
शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून एकरी तीन लाख रुपये उत्पन्न निघत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले आहे फक्त तीन महिन्यात येणारे हे पीक व उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी टरबूज पिकाच्या लागवडीकडे वळला आहे यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने पाण्याची पातळीदेखील विहिरींची चांगली रे आहे प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यावर्षी टरबूज पिकावरील व्हायरस व इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी आहे फळांचे वजन चांगले येत असून भावदेखील दहा ते पंधरा रुपये मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत एकरी तीन लाख रुपये उत्पन्न सरासरी व एकरी एकूण खर्च पन्नास हजारापर्यंत असल्याचे शेतकरी सांगत आहे तळेगाव परिसर हा टरबुजाचा पट्टा म्हणून आता ओळखला जावू लागला आहे परिसरात टरबूज खरेदीसाठी व्यापारीदेखील लांबून आता येऊ लागले आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला आहे
एकरी खर्च 50 हजार रुपये मिळत असून एकरी उत्पन्न 30 टन असून भाव 10 रुपये मिळत आहे असे एकूण3 लाख एकरी उत्पन्न मिळत आहे यावर्षी फळांना वजन चांगले असल्याने उत्पन्नात वाढ रोगाचे प्रमाण कमी असल्याचे सामरोदचे बाळू काशिनाथ चौधरी यांनी सांगितले
आम्ही पूर्वी उन्हाळ्यामध्ये मका ,गहू ,हरभरा आदी पिकांची लागवड करत होतो मात्र आता टरबूज या पिकाकडे वळलो आहोत कमी कालावधीत येणारे पीक असल्याने आम्ही टरबूज लागवड करून वर्षभरात टरबुजाची तीन ते चार पीक घेत असतो असे तळेगावचे शांताराम चौधरी यांनी सांगितले .