धरणगाव (प्रतिनिधी ) – येथील जळगाव रोडवर असणाऱ्या जिनींग कंपनीतून अज्ञात चोरटयांनी सुमारे २५ क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
येथील महाविर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवारी २३ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भींत फोडून सुमारे २ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा २५ क्विंटल कापूस चोरून नेला. हा प्रकार सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. कंपनीचे मालक सुभाष काशिनाथ पाटील याचा मुलगा देवा पाटील यांनी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. . धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह गजानन पाटील, संदीप पाटील, जितेंद्र भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.