जळगाव ( प्रतिनिधी ) – जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ६ प्रमुख गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे, चाळीसगाव तालुक्यातील टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भुसावळ तालुक्यातील कंडारी आणि साकेगावचा यात समावेश असून ९६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे ,
या महिना अखेरीस आणखी १० मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरी मिळत आहे. जिल्ह्यांतील आमदार व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार मंत्रालयात गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती. त्यात जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना ना. मंजुरी देण्याचे निर्देशही दिले होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद व एम.जी.पी.ला दिले आहेत.
जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि पहूर कसबे – ३४ कोटी १५ लक्ष ८७ हजार; मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व ७ गाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना १३ कोटी ४५ लक्ष ८९ हजार; चाळीसगाव तालुक्यातील टाकळी – २१ कोटी ३२ लक्ष रूपये ८९ हजार; भुसावळ तालुक्यातील कंडार- १७ कोटी ८९ लक्ष ९ हजार रूपये तर भुसावळ तालुक्यातील साकेगाव-८ कोटी ६२ लक्ष १५ हजार या गावांच्या योजनांचा समावेश आहे. ९५ कोटी ४५ लक्ष ८९ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अलीकडेच पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द तसेच चोपडा तालुक्यातील धानोराच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या आहेत. आता ६ गावांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली
या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, लहान आणि मध्यम लोकसंख्येच्या गावांच्या योजनांसाठीचा जिल्ह्यातील कृती आराखड्यानुसार योजनांनाची कामे सुरू झाली आहेत. मोठी गावे असणार्या ठिकाणच्या पाणी पुरवठा योजनांनासुध्दा प्राधान्य राहणार आहे. कोविडच्या काळातही राज्यासह जिल्हाभरात आपण सुरळीतपणे पाणीपुरवठा करू शकलो याचे मनस्वी समाधान आहे.