जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील लक्ष्मी नगरातील रहिवाशी असलेली ३५ वर्षीय विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता झाली आहे शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
जितेंद्र शिवाजी सगरे (वय-४०) हे . लक्ष्मी नगर येथे पत्नी कविता जितेंद्र सगरे (वय-३५), मुलगी जयश्री (वय-९) आणि मुलगा रोहित (वय-१२) यांच्यासह वास्तव्याला आहे. जितेंद्र सगरे हे मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करतात. २० डिसेंबररोजी सकाळी ४ वाजता जितेंद्र सगरे यांची पत्नी कविता कुणालाही काहीही न सांगता मुलगी जयश्री आणि मुलगा रोहित यांच्यासोबत बेपत्ता झाल्या आहे. जितेंद्र सगरे यांनी पत्नी व दोन्ही मुलांचा नातेवाईक व ओळखीच्या नागरीकांकडे शोधाशोध केली परंतू कुठेच आढळून आलेले नाही. विवाहितेला हिन्दी, पावरा व अहिराणी भाषा बोलता येते. सोमवारी दुपारी १ वाजता जितेंद्र सगरे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली केली आहे. पुढील तपास पो ना सिकंदर तडवी करत आहेत.