मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाचे महाविकास आघाडीच सरकार सत्तेत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून हे 3 चाकाचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला जात आहे.
आजही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार लवकरच कोसळणार असा दावा केला आहे. 3 पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका वेबिनारमध्ये बोलत होते. युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, काम होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही.
पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो.,पुन्हा भाजपा-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात, तर या अफवाच आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला., त्यावर कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललेच नसते. , सरकार स्थापन झाले त्यावेळी मी नवखा होतो., पण आम्ही एकमताने एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं., तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याचे उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यात आहे.
एका विचाराने झालेली युती तुटली का, याचे उत्तर शोधावे लागेल असे ते म्हणाले.
30 वर्ष युतीत होतो, बाहेर पडण्याची इच्छा नव्हती, पण, आम्ही 30 वर्ष युतीत होतो., आमची बाहेर पडण्याची इच्छा नव्हती., मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केल असे ते म्हणाले., प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते., पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, असे सांगत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी अन् वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत असे ते म्हणाले.