एकूण ६०१ प्रकरणांमध्ये ४ लाख ३० हजार दंड वसूल
जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायक प्रवासाचा अनुभव प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार भुसावल विभागाकडून विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न अधिक बळकट करण्यात येत आहेत. दि. ८ एप्रिल रोजी भुसावल विभागात “फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान” राबविण्यात आले. या विशेष अभियानांतर्गत विभागातील एकूण ८ प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला होता.


यामध्ये भुसावल, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा व अमरावती हे होते. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रवाशांना नियमांचे पालन करून वैध तिकीटासह प्रवास करण्यास प्रोत्साहित करणे तसेच अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा होता.
या अभियानात एकूण ६० तिकीट तपासणी कर्मचारी व ९ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. अभियानादरम्यान एकूण ६०१ प्रकरणांमध्ये कारवाई करून ₹ 4,30,330/- इतका दंड वसूल करण्यात आला.
याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम 145B व 167 अंतर्गत एकूण 17 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातून ₹ 2,500/- इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच, स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या १३ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर नियमानुसार प्रकरणे दाखल करण्यात आली.
भुसावल विभाग प्रवाशांना आवाहन करते की, त्यांनी योग्य व वैध तिकीट घेऊनच जबाबदारीने व सन्मानपूर्वक प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय व दंड टाळता येईल. कृपया अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकांवरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा [http://www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावरून वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा तसेच प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर ‘Rail One’ अॅप डाउनलोड करून त्याद्वारेही तिकीट बुक करू शकतात.









