शान्तनू यांचा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याशी संवाद
जळगाव (प्रतिनिधी) –सेरेब्रल पाल्सी या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या शान्तनू वगदे या ३६ वर्षीय तरूणाने शारीरिक व्यंगावर मात करीत मेरी आत्मकथा- शान्तनू वगदे हे पुस्तक हिंदी भाषेत लिहून नुकतेच प्रकाशित केले आहे. दरम्यान सोमवारी (२३ मार्च) शान्तनू वगदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
इंदौर येथील शान्तनू वगदे हा ३६ वर्षीय तरूणाला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी हा विकार जडला. आई उषा विवरेकर ह्या मुळच्या विवरे गावातील. शान्तनूचा जन्म झाल्यावर त्याला काविळ झाला. त्यावेळी वैद्यकीय दुर्लक्षामुळे शान्तनू यांची शारीरीक हालचाल मंदावली होती. मात्र त्यांचा बुध्यांक हा सामान्य व्यक्तीप्रमाणेच होता. त्यामुळे पोटचा गोळा म्हणून त्यांच्या आई उषा यांनी त्याला मानसिक आधार देत वयाच्या ३६ व्या वर्षापर्यंत शिक्षणासह त्याची वैयक्तीक देखभाल केली. शान्तनू वगदे यांनी शारीरीक व्यंगावर मात करीत बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या यशामुळे अनेकांसाठी तो प्रेरणास्थान तर ठरलाच परंतु त्याला सॅल्युट केल्याशिवाय कुणीही राहिले नाही. जन्मापासून ते वयाच्या ३६ व्या वर्षापर्यंत शारीरीक विकारामुळे जे काही अनुभव आले, ज्या व्यक्ती त्याच्या आयुष्यात आल्या, त्या सर्वांची नोंद म्हणून शान्तनू याने मेरी आत्मकथा-शान्तून वगदे हे पुस्तक लिहीले आणि प्रकाशितही केले. सोमवारी (२३ मार्च) शान्तनू वगदे यांनी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. शान्तनूची आई उषाताई आणि डॉ. उल्हास पाटील यांचे अगदी कौटुंबिक संबंध राहिले आहे. डॉ. उल्हास पाटील यांनी शान्तनूशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शान्तनूला बोलतांना अडचण होत असली तरी त्याचे भाव डॉ. उल्हास पाटील यांनी सहजगत्या टिपले. एवढेच नव्हे तर त्यांनी प्रख्यात न्युरेविकार तज्ज्ञांना व्हिडीओद्वारे संभाषण करून देत शान्तनूवर उपचार करण्याची जबाबदारी घेतली. शारीरीक व्यंग असतांनाही शान्तनूची जगण्याची उमेद ही समान्य व्यक्तींना नक्कीच प्रेरणा देणारी असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
इंदौर येथील शान्तनू वगदे हा ३६ वर्षीय तरूणाला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी हा विकार जडला. आई उषा विवरेकर ह्या मुळच्या विवरे गावातील. शान्तनूचा जन्म झाल्यावर त्याला काविळ झाला. त्यावेळी वैद्यकीय दुर्लक्षामुळे शान्तनू यांची शारीरीक हालचाल मंदावली होती. मात्र त्यांचा बुध्यांक हा सामान्य व्यक्तीप्रमाणेच होता. त्यामुळे पोटचा गोळा म्हणून त्यांच्या आई उषा यांनी त्याला मानसिक आधार देत वयाच्या ३६ व्या वर्षापर्यंत शिक्षणासह त्याची वैयक्तीक देखभाल केली. शान्तनू वगदे यांनी शारीरीक व्यंगावर मात करीत बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या यशामुळे अनेकांसाठी तो प्रेरणास्थान तर ठरलाच परंतु त्याला सॅल्युट केल्याशिवाय कुणीही राहिले नाही. जन्मापासून ते वयाच्या ३६ व्या वर्षापर्यंत शारीरीक विकारामुळे जे काही अनुभव आले, ज्या व्यक्ती त्याच्या आयुष्यात आल्या, त्या सर्वांची नोंद म्हणून शान्तनू याने मेरी आत्मकथा-शान्तून वगदे हे पुस्तक लिहीले आणि प्रकाशितही केले. सोमवारी (२३ मार्च) शान्तनू वगदे यांनी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. शान्तनूची आई उषाताई आणि डॉ. उल्हास पाटील यांचे अगदी कौटुंबिक संबंध राहिले आहे. डॉ. उल्हास पाटील यांनी शान्तनूशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शान्तनूला बोलतांना अडचण होत असली तरी त्याचे भाव डॉ. उल्हास पाटील यांनी सहजगत्या टिपले. एवढेच नव्हे तर त्यांनी प्रख्यात न्युरेविकार तज्ज्ञांना व्हिडीओद्वारे संभाषण करून देत शान्तनूवर उपचार करण्याची जबाबदारी घेतली. शारीरीक व्यंग असतांनाही शान्तनूची जगण्याची उमेद ही समान्य व्यक्तींना नक्कीच प्रेरणा देणारी असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.











