गुवाहाटी ( वृत्तसंस्था )– त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांची न्यायव्यवस्थेविरोधातच बंडाळी केली आहे प्रशासनाने न्यायालयाच्या हवामानाची भीती बाळगू नये , नियंत्रण माझ्या हातात आहे असे विधान त्यांनी अधिकाऱ्यांच्या संघटनेच्या एका परिषदेत केले

तुम्ही तुमचं काम करताना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती बाळगू नका, मी सामोरा जाईल. न्यायालय आदेश देऊ शकते पण आदेशाचे पालन कोण करणार? कारण पोलीस माझ्या नियंत्रणाखाली आहेत,” असंही बिप्लब देव म्हणाले.
शनिवारी टीसीएस अधिकाऱ्यांच्या २६ व्या द्विवार्षिक परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, “मला अधिकारी सांगतात की न्यायालयाचा अवमान होईल, या भीतीमुळे ते एखादं काम करू शकत नाहीत. अशी भीती कशाला? न्यायालय निर्णय देण्याचं काम करते पण पोलीस त्याची अंमलबजावणी करतात आणि पोलीस माझ्या नियंत्रणात आहेत. पोलिसांकडे त्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि मी त्याचा साक्षीदार आहे, आतापर्यंत न्यायालयाचा अवमान केल्यानं किती लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं, मी इथे आहे, न्यायालयाच्या अवमानात तुम्ही तुरुंगात जाण्यापूर्वी मी जाईल, “कोणालाही तुरुंगात टाकणं सोप्पं नसतं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांचं काम लक्षात ठेवलं जातं. कोर्ट पोलिसांना एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यास सांगत असेल तर आरोपी सापडलाच नाही, असं पोलिसांनी सांगावं. शेवटी ताकद तर बापाच्या हातात असते ना,” असंही देब म्हणाले
देब यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री स्वतः न्यायपालिकेचा अपमान कसे करू शकतात, असा सवालही करण्यात येत आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी देब यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे, न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे. न्यायव्यवस्थेप्रती गंभीर अनादर दाखवणाऱ्या वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का?” असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.







