जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथून जवळच पळसखेड ककर बेरजळ शिवारात एका शेतातील विहिरीत बुडून ३६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
नितीन रंगलाल राठोड (वय ३६ वर्ष) यांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती धामणगाव बढे पोलिसांना मिळाली. यानंतर, उपरोक्त ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला असता मृतक बुडालेल्या अवस्थेत दिसून आला. मृतक नितीन राठोड हा जामनेर तालुक्यातील पळसखेड येथील रहिवासी होता. एका शेतकऱ्याने ही माहिती दिली. यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.