पत्रपरिषदेत दिली माहिती, जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते, प्रतोद
न्यायालयीन लढाई लढणार नाही
मुंबई (प्रतिनिधी) – देशाच्या प्रधानमंत्र्यांनी २ दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात वक्तव्य केले होते. “राष्ट्रवादी भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष” असे म्हटले. आज ज्यांच्यावर आरोप केले त्यांना शपथ देऊन भाजपाने मुक्त केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच, अजित पवारांनी राजीनामा दिला, त्याची माहिती मला नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही न्यायालयीन लढाई लढणार नाही, पक्ष म्हणून जनतेसमोर जाऊ. उद्या कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या संधीचे दर्शन घेणार आहे, अशी माहिती देत पवार म्हटले की, काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली. तर काही सहकाऱ्यांची भूमिका पुढील २ ते ३ दिवसात बाहेर येईल. आजचा प्रकार इतरांना नवीन, मला नाही. जे गेले ते आम्हाला संपर्क साधत आहेत. १९८६ मध्येही मला अनेक जण सोडून गेले होते. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर व तरुणांवर प्रचंड विश्वास आहे.
कुणी कितीही व काहीही दावा केला तरी आम्ही जनतेत जाऊन आमची भूमिका मांडणार आहोत. माझा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास आहे. शिवसेना ठाकरे गट व काँग्रेससोबत बसून विरोधी पक्षाबाबत चर्चा करू, असे शरद पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी दिलेली जबाबदारी पार पाडली नाही. शपथविधीपूर्वी फक्त भुजबळांसोबत बोलणं झाले होते, असेही पवार म्हणाले.