मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पनवेलच्या एसटी महामंडळाने ही त्यांच्या कर्मचार्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर राज्यभरात लाखो लोकांच्या प्रवासाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या चालक-वाहकांना बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि ही अत्यावश्यक सेवा असल्याने पूर्णपणे बंद ठेवणेही शक्य नाही. दर दिवशी एसटीच्या बस आगारात शेकडो प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर पनवेलच्या एसटीच्या पनवेल बस आगारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पनवेल एसटी आगारातर्फे हात धुण्यासाठी सॅनिटराईझ देण्यात येत आहे. प्रादुर्भाव कसा रोखावा स्वच्छता कशाप्रकारे करावी याबद्दलही प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसवर कर्तव्य असलेल्या वाहक, कर्मचारी खबरदारी घेऊन तोंडाला मास्क बांधून आपले कर्तव्य बजावत आहे. जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळत असल्याने शासन-प्रशासन या विषाणूचा संसर्गचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न उपाय योजना करत आहेत.पनवेलच्या बस आगारात प्रवासी संख्येत घट झाली आहे. एकूण 163 फेऱ्या रद्द करण्यात आलेला आहे. तर 3601 किलोमीटर रद्द करण्यात आले आहे. लोक स्वतःहून प्रवास करणे टाळत आहे. यामुळे एस टी मोकळ्या धावत आहेत. यामुळे दिवसाचे अंदाजे सव्वा लाखाची तूट या बस आगारात होत आहे.