पाचोरा (प्रतिनिधी) – येथील हीवरा नदीचा कृष्णापुरी भागाला जोडणारा पुल ऐन पावसाळ्यात तोडल्याने पुलाचे काम झाले नाही बळी मात्र जात आहे आज पुन्हा एक बळी गेला असल्याने चिंता वाढली आहे.

शासनाच्या परीपत्रकानुसार ऐन पावसाळ्यात रस्ते किंवा पुलाची कामे करु नये असा नियम असताना पाचोरा नगर परिषदच्या मनमानीमुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते फोडुन ठेवले गेले आहेत पाचोरा आणि कृष्णापुरी भागाला जोडणारा पुल कोणतीही व्यवस्था न करता तोडण्यात आला . नागरिकांची ये जा बंद केली आहे यामुळे नागरिकांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जनतेचा उद्रेकाची वाट न. पा प्रशासन बघत आहे असेच वाटत आहे. त्यातच जेथे पुल तोडला त्या ठिकाणी वाहत जाणाऱ्यांना वाचविण्यासाठी दोर कींवा कोणतीच व्यवस्था ठेवली नाही त्यामुळे पाण्यात पडलेला वाचु शकत नाही.
आज पुन्हा पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवाशी उत्तम पांचाळ यांचा मुलगा साहेबराव पांचाळ याचा नदीकाठी तोल सुटल्याने तो पाण्यात वाहून गेला उत्तम पोहन्याची शैली असताना देखील तो स्वतः बाहेर निघण्यास अपयशी ठरला. तो अद्याप सापडलेला नाही यापुर्वी आठ दिवसांपासून शिंपी नामक युवक अद्याप बेपत्ता आहे.
दोन लोकांचा जीव जाणे याला कोण जबाबदार आहे याची नगर परिषदने जबाबदारी घेवुन तात्काळ त्या परीवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. चुकीच्या वेळी कामे केल्याने या परीसरातील ये जा करणार्यांना पेट्रोल व डिझेल बरोबर मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असुन यापुढे नगर परिषदेने असे करु नये , असेही ते म्हणाले .







