मेलबर्न (वृत्तसंस्था) – सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांच्या खणखणीत अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी 185 धावांचं आव्हान ठेवले आहे.
प्रत्युत्तरात भारताचा निम्म संघ माघारी परतला असून 11.3 षटकांत भारताच्या 58 धावा झाल्या आहेत. भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाज शफाली वर्मा 2(3), जेमिमा राॅड्रिग्स 0(2), स्मृति मंधाना 11(8), हरमनप्रीत कौर 4(7) आणि वेदा कृष्णमूर्ति 19(24) माघारी परतल्या आहेत.ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासेनने 2, मेगन शूट, सोफिया मोलिनेक्स आणि डेलिसा किम्मिंस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.