मुंबई (वृत्तसंस्था) – देशभरात गेल्या काही दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जेजुरी पोलीस दल यशस्विरित्या परिस्थिती हाताळत आहे. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी चोखपणे बजावले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात जेजुरी पोलिसांनी सतत गल्लोगल्ली फिरून कधी प्रेमाने तर कधी कायद्याचा धाक दाखवून घरात बसण्याचे आवाहन केले. जेजुरी पोलिसांच्या वतीने आज शहरातून पथसंचलन करण्यात आले. पोलीस पथकाचे संचालन करीत असताना पोलीस स्टेशनच्या समोर जेजुरीतील तरुणांनी सामाजिक अंतर राखत दुतर्फा उभे राहत पोलिसांवर पुष्प वर्षाव केला. या पथसंचालनाचे नेतृत्व जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अंकुश माने यांनी केले.