जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नशिराबाद नगरपरिषदेवर पूर्णवेळ प्रशासकाची नेमणूक करावी अशा मागणीचे निवेदन आज नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले

नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये झाले कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली . पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी अडचणी येत आहेत पावसाळा सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांसह गावातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत आहे परिणामी अपघाताचा धोका आहे गटारींची अस्वच्छता वाढत आहे साथीचे आजारांचे रुग्ण वाढत आहेत पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगूसह अन्य आजार फोफावत आहे बस स्थानक चौकातील हाय मस्ट लॅम्पसह गावात अनेक ठिकाणी पथदीवे बंद आहेत भर पावसाळ्यात सहाव्या – सातव्या दिवशी दूषित पाणीपुरवठा होत आहे या समस्या मांडाव्या तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे समस्या सोडविण्यासाठी पूर्ण वेळ प्रशासक मिळावा ही नाशिराबादकर जनतेची मागणी आहे
हे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले यावेळी प्रा विश्वनाथ महाजन व योगेश कोलते यांनी विविध समस्यांवर चर्चा केली स्वयंशोध फाउंडेशनच्यावतीने अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी , प्रा विश्वनाथ महाजन नीरज चीतोडे, अंशुल पिंगळे ,सौरभ चौधरी, अक्षय वाणी, तेजस बुरुजवाले सागर मोरे हे उपस्थित होते.







