भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा व भडगाव तालुक्यातील मोसंबी, लिंबुसह फळपीक गळती झालेल्या फळबागांच्या मालक शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिंपळगाव हरेश्वर परिसरासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख फळपीक मोसंबी व लिंबूसह, डाळींब, पेरू, सीताफळ या फळपिकांच्या मृग बहारात मोठ्या प्रमाणात फळगळती झाली होती. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभागाकडे नुकसानीबाबत वारंवार माहिती देऊनदेखील कुठलीही दखल घेतली न गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्याकडे माहिती दिली असता त्यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून जि.प.सदस्य मधुकर काटे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, किसान मोर्च्या पाचोरा अध्यक्ष विश्वास पाटील, भडगाव अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या उपस्थितीत १३ ऑगस्टरोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेमध्ये १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देय आहे. पावसाचा खंड पडल्यावरदेखील भरपाईची तरतूद करण्यात आलेली असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे नुकसानीबाबत माहिती दिली असता कुठलेही विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली नसल्याची तक्रार करून अमोल शिंदे यांनी .जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने विमा संरक्षणाचा लाभ होईल याबाबत कारवाई करण्याची विनंती करून ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले नाही अशा शेतकऱ्यांना देखील नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत करून दिलासा द्यावा. अशा विनंतीचे निवेदन दिले होते.
आता पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत भडगाव तालुक्यातील लिंबूसाठी ३४९, मोसंबीसाठी ३३, व डाळींब साठी २ असे एकूण ३८४ शेतकऱ्यांना २ ०२,६९,१००/- रुपये तर पाचोर्यातील लिंबूसाठी ५४, मोसंबीसाठी ९५, पेरूसाठी ०२, डाळिंबसाठी २, सीताफळसाठी २, असे एकूण १५५ शेतकऱ्यांना १,२२,९२,९००/- रुपये मंजूर करण्यात आले आहेत.







