पीठ गिरणीमालक – चालकांकडून सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पीठ गिरणी मालक- चालकांच्या प्रश्नांबाबत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. याबाबत पीठ गिरणी मालकांनी आ. राजूमामा भोळे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे चिरंजीव विशाल भोळे यांनी सत्कार स्वीकारला.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे व जिल्ह्यातील पीठ गिरणी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम नाथवाडा येथील जगदीश्वर मंदिरात पार पडला. प्रमुख मागण्यांत पीठ गिरणीचा औद्योगिक दर्जा काढून गृउद्योगात सामविष्ट करा, त्याचप्रमाणे वीज दर लागू करा, अवैध घरघंटीचा बंदोबस्त करा, या उद्योगाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या, संरक्षण विमा द्या, वयाच्या पन्नाशी नंतर मानधन सुरु करा आदी मागण्या आहेत.
२ रु. किलो धान्याला ८ रु. वीज दर सरकार २ रु. किलो धान्य देत आहे. मात्र, महापारेषणकडून तेच धान्य दळण्यासाठी ८ रु. वीज आकारणी करत आहे. गृहउद्योगाला २ रु. युनीटदर आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असून या उद्योगाचा औद्योगीक दर्जा काढून गृहउद्योगात समावीष्ट करा, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी अधिवेशनात मांडली होती.