मातापित्यांनी स्वतः संस्कारवान असणे अगदी आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार करावे. लहान मुलांना नुसते शिकवल्याने ते शिकत नाहीत तर त्यांना चांगल्या गोष्टी दाखवा. त्यातूनच ते समजून घेतात व त्या गोष्टी फार लवकर शिकतात. त्यांच्यामध्ये समर्पण भावना तीव्र असते. मातापित्यांनी त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या कामातून वेळ काढून मुलांवर चांगले सुसंस्कार केले पाहिजे. आजकालचे पालक त्यांच्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही कारण त्यांचा खूप वेळ नोकरी किंवा त्यांचा व्यवसाय यातच चालला जातो. मुलांची आणि त्यांची साधी भेटसुद्धा बऱ्याच वेळेत होत नाही असे श्री. प. पू. सुमितमुनीजी महाराज त्यांच्या प्रबोधनात म्हणाले.
तसेच बालकांना पुष्कळ वेळा आईवडील मोबाईल देतात पण असे केल्याने मुलांवर दुष्परिणाम होतात असे त्यांनी सांगितले. मुलांची चांगल्या संतसाधूंशी, महात्म्यांशी भेट घडवून आणावी. धार्मिक लोकांचा व सज्जनांचा नेहमी सत्कार व सन्मान करावा. चांगल्या संस्काराने बालकांचा मानवी जीवनमुल्ये शिकण्याने पाया मजबूत होतो. ते सुसंस्कारी बनतात.
मानवी जीवन हे क्षणभंगुर असते कारण माणसांना त्यांची सर्व संपत्ती व पैसा, बायको व मुलबाळे हे सर्व या जन्मात येथेच सोडून जावे लागते. माणसे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडतात आणि किड्यामुंग्यांसारखे हिंसाचारात बळी पडतात. त्याच वेळी टीव्हीवर असे दाखवले जाते की, लग्नाचा स्वागत समारंभ हा अलिशान हॉटेलमध्ये सुरु आहे. वरवधू भारी पोषाखात एकमेकांशी बोलत उभे आहेत. पाहुणेमंडळी भोजनात विविध अन्नपदार्थ व पेये यांचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही हे दोन्ही दृश्ये बघतात पण त्यांच्या मनात काहीच चांगले विचार येत नाहीत. मानवाने “इदं न मम्” हे कायम लक्षात ठेवावे. या जगात जे जे काही आहे ते माझे नाही असा या संस्कृत वचनाचा अर्थ आहे. जीवनात काहीही ”माझे” नाही असे श्री. प. पू. भुतीप्रज्ञमुनीजी महाराज सुरुवात करतांना म्हणाले. आपण अनन्यत्वाची भावना मनात व कृतीत ठेवावी, असे त्यांनी सांगितले.