दोन वर्षांनी आज महापालिकेची ऑफलाईन महासभा


जळगाव ( प्रतिनिधी ) – महासभेच्या प्रारंभी शहरातील कोरोना लसीकरणाबद्दल आयुक्तांनी विश्लेषण केल्यावर लगेच कैलास सोनवणे यांनी उपमहापौर सभागृहात कोणत्या अधिकाराने ? ; त्यांना सभागृहाबाहेर काढा अशी मागणी करणारा बॉम्बगोळा टाकला . उपमहापौर कुलभूषण पाटील आणि कैलास सोनवणे एकेरीवर आले . महासभेत खळबळ उडाली .

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही कैलास सोनवणे यांना प्रत्युत्तर दिले, नैतिकता काढली .
उपमहापौर कोणत्या अधिकारात अधिकाऱ्यांच्या बैठक घेतात आणि फाईल माझ्या मार्फतच मंजूर झाली पाहिजे असे कोणत्या अधिकारात सांगतात ? , असा प्रश्न कैलास सोनवणे यांनी उपस्थित केला होता त्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले , गैरव्यवहार सिद्ध करा , उद्या सकाळी राजीनामा देतो . तुम्ही पदावर असताना काय केले हे सगळ्या गावाला माहिती आहे . उलट नैतिकता असेल तर कैलास सोनवणे यांनी सभागृहाच्या कामात सहभागी होऊ नये . सोनवणे यांना न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे . असे उपमहापौर म्हणाले .
त्यावर महापौर जयश्री महाजन यांनी कैलास सोनवणे यांना सूचना केली की , महासभेत उपमहापौर यांनी उपस्थित राहण्याची पद्धत आपल्या महापालिकेत पूर्वीपासून आहे . अजेंड्यावर नसलेले विषय आता का मांडत आहात ? कायद्याने जाता येते
त्यांनतर कैलास सोनवणे म्हणाले त्याप्रमाणे मी भेटीला बोलावलेल्या जोशी नावाच्या व्यक्तीला सभागृहात बोलावा आणि विचारा की , मी जोशी यांना बोलावले का ? त्यांना काय म्हणालो हे त्यांना सभागृहात सांगू द्या . ते तसे म्हणाले तर मी आताच्या आता राजीनामा देतो , असे आव्हानच उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कैलास सोनवणे यांना दिले .

एवढ्यात एका नगरसेविका घरापट्टीच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी महापौरांकडे परवानगी मागत होत्या . त्यांनाही कैलास सोनवणे यांनी अडवले आणि भूमिका ठाम राहणार असल्याचे सांगितले .
त्यावर महापौर जयश्री महाजन म्हणल्या की , आजच्या महासभेत उपमहापौर बसतील तुम्ही आज जो आक्षेप घेताय त्याची पूर्वसूचना कुणालाच नव्हती असा अचानक कोणताच निर्णय घेता येत नाही कैलास सोनवणे उपमहापौर यांच्यावर आरोप करत आहेत . नुसत्या आरोपाने कुणावर कारवाई करता येत नाही आरोप सिद्ध व्हावा लागतो त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर पुढचा निर्णय घेतला जाईल उपमहापौर यांच्यावर आता ऐनवेळी आरोप होतो आहे . ते आज सभागृहात बसतील . तरीही कैलास सोनवणे आपल्या आरोपावर आणि भूमिकेवर ठाम होते .
त्यांनतर नितीन लढ्ढा यांनी मध्यस्थी केली . सभागृहाच्या कामाच्या तरतुदीनुसार महासभेचे कामकाज झाले पाहिजे अशी भूमिका नितीन लढ्ढा यांनी घेतली होती . त्यावर कैलास सोनवणे म्हणाले की , चुकीचे काम होऊ द्या अशी विनंती मला नितीन लढ्ढा करतातच कसे ? बऱ्याच गदारोळानंतर अखेर कैलास सोनवणे शांत झाले .







