शॉर्टसर्किटमुळे पीक जळाले, जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील लमांजन येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आग लागल्याने पिकासह चारा जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्याचे लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याने पाच महिन्यापूर्वीच महावितरणला पत्र देऊन शेतात लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करून देण्याबाबत विनंती केली होती. मात्र महावितरणने केलेल्या गंभीर दुर्लक्षामुळे आज शेतकऱ्याचे पीक व चारा जळून खाक झाला आहे.
लमांजन येथील हिलाल नामदेव पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापूस पीक आणि चारा ठेवलेला होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्याच्या शेतामध्ये काही विजेच्या तारा खाली आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या पिकांसह जीवितहानीचा धोका निर्माण झाला होता. याबाबत हिलाल पाटील यांनी म्हसावद सबस्टेशन येथील सहाय्यक अभियंता यांना दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी पत्र दिले होते. संबंधित तारा दुरुस्त करून द्याव्यात अशी विनंती केली होती.
त्यानंतर मात्र महावितरणने या पत्राला केराची टोपली दाखवत गंभीर दुर्लक्ष केले. परिणामस्वरूप गुरुवारी दि. ९ मे रोजी हिलाल पाटील यांच्या शेतामध्ये आग लागली. हे आगीमध्ये त्यांचं कपाशीचे पीक
शेतातील दादरचा चारा व कणस
आणि चारा जळून खाक झाला आहे. सुमारे १ लाख रुपये नुकसान शेतकऱ्याला झाले आहे. याप्रकरणी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत लवकरात लवकर पंचनामा करून हिलाल पाटील या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी अशी मागणी लमांजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.